"टीईटी पेपरफुटीचे ‘आग्रा कनेक्शन’! छपाई केंद्रातूनच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्या का? तपासाचा फास आवळला". आग्रा प्रेस, वाहतूक साखळी आणि दलालांचे जाळे तपासाच्या रडारवर; दीड कोटींच्या व्यवहाराचा संशय
"टीईटी पेपरफुटीचे ‘आग्रा कनेक्शन’! छपाई केंद्रातूनच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्या का? तपासाचा फास आवळला". आग्रा प्रेस, वाहतूक साखळी आणि दलालांचे जाळे तपासाच्या रडारवर; दीड कोटींच्या व्यवहाराचा संशय मुंबई/वृत्तसेवा महाराष्ट्रातील टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणाने राज्याच्या शिक्षण व्यवस्थेलाच हादरा दिला असून, या घोटाळ्याचे धागेदोरे आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील छपाई केंद्रापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका आग्रा येथील खासगी प्रेसमध्ये छापण्यात आल्या होत्या. त्यामुळे पेपरफुटीची सुरुवात नेमकी छपाई केंद्रातून झाली का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, परीक्षेच्या काही आठवडे आधी मूळ प्रश्नपत्रिका आग्रा येथील प्रेसमध्ये पाठविण्यात आल्या होत्या. तेथे भाषांतर आणि छपाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका महाराष्ट्रात पाठविण्यात आल्या. याच टप्प्यात गोपनीयतेचा भंग झाला की महाराष्ट्रात आणताना पेपर बाहेर पडले, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटीच्या मूळ प्रश्नपत्रिकांचे संच जप्त करण्...