पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

BLO शिक्षकांमध्ये आदेशांचा गोंधळ; दोन तालुके, दोन भूमिका… निवडणूक यंत्रणा की शिक्षण व्यवस्था? सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात विरोधाभासी आदेश; शिक्षकांमध्ये संताप, निवडणूक आयोगाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

इमेज
BLO शिक्षकांमध्ये आदेशांचा गोंधळ;  दोन तालुके, दोन भूमिका…  निवडणूक यंत्रणा की शिक्षण व्यवस्था? सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात विरोधाभासी आदेश;  शिक्षकांमध्ये संताप,  निवडणूक आयोगाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सिंदखेडराजा/देऊळगावराजा/वृत्तसेवा   विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांमध्ये सध्या प्रचंड संभ्रम, असंतोष आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी पुनरीक्षणाचे अत्यंत महत्त्वाचे आणि वेळबद्ध काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडून शाळेचे नियमित शैक्षणिक काम पूर्ण करून त्यानंतरच BLO ची जबाबदारी पार पाडण्याचे आदेश दिले जात आहेत. या परस्परविरोधी आदेशांमुळे शिक्षक अक्षरशः कात्रीत सापडले आहेत. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांनी 26 जून 2026 रोजी काढलेल्या आदेशात BLO व BLO पर्यवेक्षक म्हणून नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना 30 जून ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावध...

देशातील २२ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापक पदे रिक्त; नऊ आयआयटींमध्ये आरक्षित प्रवर्गातील तब्बल ६०% जागा भरायच्या बाकी; जातनिहाय माहिती दिलेल्या संस्थांमध्ये SC, ST व OBC प्रवर्गातील ८८८ पदे रिक्त; गुणवत्तापूर्ण पीएचडी उमेदवारांची कमतरता असल्याचा आयआयटी प्रशासनाचा दावा

इमेज
देशातील २२ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापक पदे रिक्त;  नऊ आयआयटींमध्ये आरक्षित प्रवर्गातील तब्बल ६०% जागा भरायच्या बाकी जातनिहाय माहिती दिलेल्या संस्थांमध्ये SC, ST व OBC प्रवर्गातील ८८८ पदे रिक्त;  गुणवत्तापूर्ण पीएचडी उमेदवारांची कमतरता असल्याचा आयआयटी प्रशासनाचा दावा नवी दिल्ली/वृत्तसेवा देशातील अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IIT) प्राध्यापकांच्या रिक्त पदांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, देशातील २२ आयआयटींमधील १२,१९८ मंजूर प्राध्यापक पदांपैकी ४,६४० पदे म्हणजेच ३८.०४ टक्के पदे अद्याप रिक्त आहेत. म्हणजेच प्रत्येक दहा पदांपैकी जवळपास चार पदे भरलेली नाहीत.  याहून गंभीर बाब म्हणजे जातनिहाय माहिती उपलब्ध करून देणाऱ्या केवळ नऊ आयआयटींमध्ये एकूण १,५०१ रिक्त पदांपैकी ८८८ पदे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील आहेत. म्हणजेच या संस्थांतील रिक्त पदांपैकी जवळपास ६० टक्के पदे आरक्षित प्रवर्गातील असल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.  आकडेवारीनुसार, रिक्त पदांमध्ये ओबीसी प्रवर...

नवजात बाळ विक्री प्रकरणाचा तपास अधिक गतीमान; दोन महिलांना अटक, संबंधित राजकीय चर्चांना उधाण

इमेज
नवजात बाळ विक्री प्रकरणाचा तपास अधिक गतीमान;  दोन महिलांना अटक, संबंधित राजकीय चर्चांना उधाण चंद्रपूर/वृत्तसेवा चंद्रपूर शहरातील नवजात बाळ विक्री प्रकरणाचा तपास अधिक गतीमान झाला असून, या प्रकरणात आणखी दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे अशी असून, त्या स्थानिक भाजपच्या राजकीय वर्तुळाशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र भाजपने यासंदर्भात भूमिका घेतलेली नाही. पोलिसांनी दोघींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे समजते. रामनगर पोलिसांनी मे २०२६ मध्ये नवजात बालकांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले होते. तपासात एका अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाची पैशांच्या मोबदल्यात विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. या प्रकरणात मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित मुलीची आई तसेच बाळ खरेदी केल्याचा आरोप असलेल्या महिलांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. आरोपींवर मानवी तस्करी तसेच पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.  तपासादरम्यान काही काग...

१५ वर्षांनंतर न्याय! रिसोड कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप; २०११ मध्ये पारधी तरुण बेग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

इमेज
१५ वर्षांनंतर न्याय! रिसोड कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप २०११ मध्ये पारधी तरुण बेग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी  वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल वाशिम, दि. २ (वृत्तसेवा)  वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्यात २०११ मध्ये घडलेल्या गाजलेल्या पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. २) ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला. तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या न्यायालयीन लढ्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी समाजातील बेग्या पवार या तरुणाला चोरीच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ९ मे २०११ रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकून बेग्या पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी बेग्या पवार यांना पोलीस ठाण्...

FDA चा संभाजीनगरात मध्यरात्री धडक; नामांकित 'यल्ला यल्ला' व 'आईच्या गावात फेमस टेन' रेस्टॉरंट्स सील; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; अस्वच्छता, प्रतिबंधित रंगांचा वापर आणि ग्राहकांची फसवणूक उघड

इमेज
FDA ची संभाजीनगरात मध्यरात्री धडक;  नामांकित 'यल्ला यल्ला' व 'आईच्या गावात फेमस टेन' रेस्टॉरंट्स केले सील आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम;  अस्वच्छता, प्रतिबंधित रंगांचा वापर आणि ग्राहकांची फसवणूक उघड छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ३० जूनच्या मध्यरात्रीपासून १ जुलैपर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरात राबविलेल्या विशेष धडक मोहिमेत अनेक नामांकित हॉटेल्स व रेस्टॉरंट्समधील अन्न सुरक्षा नियमांच्या गंभीर उल्लंघनाचा पर्दाफाश केला. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत प्रसिद्ध 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात फेमस टेन' या रेस्टॉरंट्सना सील करण्यात आले असून त्यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईपूर्वी FDA ने शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट चालकांची बैठक घेऊन अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. स्वच्छता, दर्जेदार कच्चा माल, अन्न साठवणुकीची योग्य पद्धत, प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर टाळणे आणि ग्राहकांची दिश...

फेसबुकवरील मैत्री पडली महागात; ट्रेडिंगमधून बख्खळ कमाईचे आमिष; नाशिकमध्ये तिघांची ३७.९१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

इमेज
फेसबुकवरील मैत्री पडली महागात;  ट्रेडिंगमधून बख्खळ कमाईचे आमिष  नाशिकमध्ये तिघांची ३७.९१ लाखांची ऑनलाइन फसवणूक नाशिक : सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत ट्रेडिंग व्यवसायातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकमधील एका सेवानिवृत्त व्यक्तीसह तिघांची तब्बल ३७ लाख ९१ हजार ३६४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त व्यक्तीला जुलै २०२५ मध्ये फेसबुकवर 'अंजली अग्रवाल' नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. संबंधित महिलेने आपल्या प्रोफाइलमध्ये पश्चिम बंगालमधील एका नामांकित कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असल्याचे नमूद केले होते. सुरुवातीला फेसबुकवर साध्या गप्पांमधून ओळख वाढली. त्यानंतर दोघांमधील संवाद व्हॉट्सअॅपवर सुरू झाला. विश्वास संपादन केल्यानंतर महिलेने ऑनलाइन ट्रेडिंगमधून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच मोठा नफा झाल्याचे कथित स्क्रीनशॉटही पाठवून स...

शिक्षकांना बीएलओ म्हणून पूर्णवेळ कार्यमुक्तीचा आदेश; शिक्षण विभागाने घेतली हरकत, सिंदखेडराजात प्रशासकीय पेच निर्माण मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती की शिक्षणाला प्राधान्य? प्रशासनातील दोन आदेश आमनेसामने

इमेज
शिक्षकांना बीएलओ म्हणून पूर्णवेळ कार्यमुक्तीचा आदेश;  शिक्षण विभागाने घेतली हरकत, सिंदखेडराजात प्रशासकीय पेच निर्माण मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती की शिक्षणाला प्राधान्य?  प्रशासनातील दोन आदेश आमनेसामने सिंदखेडराजा :- विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) व BLO पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कार्यमुक्त करण्याच्या निवडणूक प्रशासनाच्या आदेशामुळे शिक्षण विभाग आणि निवडणूक प्रशासन यांच्यातील अधिकारक्षेत्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सिंदखेडराजा यांनी २६ जून २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची BLO व BLO पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना ३० जून ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्णवेळ कार्यमुक्त करून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशात घरभेटी, मतदार पडताळणी, नवीन मतदार नो...

सिंदखेडराजा येथे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

इमेज
सिंदखेडराजा येथे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न सिंदखेडराजा, दि. १ जुलै – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील महाराष्ट्रासह १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. जालना रोडवरील जिजाऊ सृष्टी सभागृहात दुपारी ३ वाजता झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने हा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक तसेच विविध विभागांच्या यंत्रणांना कालबद्ध पद्धतीने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. बैठकीत प्रा. संजय खडसे यांनी सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व पर्यवेक्षकांना कामकाजाचा वेग वाढविण्यासह पारदर्श...

एनसीईआरटीच्या नववीच्या समाजशास्त्र पुस्तकावरून वाद; प्रस्तावना, धर्मनिरपेक्षता आणि मनुस्मृतीच्या उल्लेखावर चर्चा

इमेज
एनसीईआरटीच्या नववीच्या समाजशास्त्र पुस्तकावरून वाद;  प्रस्तावना, धर्मनिरपेक्षता आणि मनुस्मृतीच्या उल्लेखावर चर्चा नवी दिल्ली | वृत्तसेवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या एनसीईआरटीच्या इयत्ता नववीच्या नव्या समाजशास्त्र पाठ्यपुस्तकावरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. नव्या पुस्तकात भारतीय संविधानाची प्रस्तावना (Preamble), "धर्मनिरपेक्ष" आणि "समाजवादी" या संज्ञांचा पूर्वीप्रमाणे स्वतंत्र उल्लेख नसल्याने विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि शिक्षणतज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.  नव्या पुस्तकात संविधान, लोकशाही संस्था, निवडणूक आयोग आणि १९७५-७७ च्या आणीबाणीवरील स्वतंत्र विभागाचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर भारतीय लोकशाही संस्थांच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे.  वाद निर्माण झाल्यानंतर एनसीईआरटीने स्पष्टीकरण देत म्हटले की संविधानाची प्रस्तावना अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेली नाही. नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार (NCF) विषयांचे पुनर्वितरण करण्यात आले असून प्रस्तावना आणि संबंधित संकल्पनांचे सविस्तर अध्ययन पुढील इयत्तां...

संभाजीनगर हादरले; नापास केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला

इमेज
संभाजीनगर हादरले; नापास केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला संभाजीनगर | प्रतिनिधी संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील एका शाळेत नववीतील अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षकावर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला अटक करून बालगृहात दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी नववीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा शाळेत प्रवेश घेतला नव्हता. मंगळवारी दुपारी तो शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) घेण्यासाठी शाळेत आला होता. यावेळी मुख्याध्यापकांनी त्याला आवश्यक अर्ज भरून देण्यास तसेच शाळेची थकबाकी जमा करण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थ्याने अर्ज भरण्यास नकार दिला. अर्जाशिवाय दाखला देता येणार नसल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केल्यानंतर त्याने आपल्या वर्गशिक्षकांना कार्यालयात बोलावण्याची मागणी केली. मुख्याध्यापकांच्या दालनात चर्चा सुरू असताना विद्यार्थ...

"९६ मानधन शिक्षकांना न्यायालयाचा दिलासा; ॲड. योगेश जायभाये यांच्या युक्तिवादामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाला स्टे!"

इमेज
"९६ मानधन शिक्षकांना न्यायालयाचा दिलासा;  ॲड. योगेश जायभाये यांच्या युक्तिवादामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाला स्टे!" नंदुरबार | वृत्तसेवा  नंदुरबार जिल्ह्यात मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या ९६ शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित प्रकरणात न्यायालयाने अंतरिम स्थगिती (स्टे) आदेश दिल्याने शिक्षकांच्या सेवेसमोरील तातडीचा धोका टळला आहे. पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत नंदुरबार जिल्ह्यासाठी दोन गट तयार करण्यात आले होते. यातील पहिल्या गटातील अनेक शिक्षक शिक्षण सेवक म्हणून नियुक्त होऊन इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात मानधन तत्त्वावर कार्यरत असलेले ९६ शिक्षक अनेक वर्षांपासून दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. दरम्यान, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी बाहेरील जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना नंदुरबार जिल्ह्यात प्राधान्य देण्याबाबत आदेश जारी केला होता. मात्र जिल्ह्यातील उपलब्ध जागा मर्यादित असल्याने या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून से...

"टीईटी पेपरफुटीचे ‘आग्रा कनेक्शन’! छपाई केंद्रातूनच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्या का? तपासाचा फास आवळला". आग्रा प्रेस, वाहतूक साखळी आणि दलालांचे जाळे तपासाच्या रडारवर; दीड कोटींच्या व्यवहाराचा संशय

इमेज
"टीईटी पेपरफुटीचे ‘आग्रा कनेक्शन’!  छपाई केंद्रातूनच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्या का?  तपासाचा फास आवळला". आग्रा प्रेस, वाहतूक साखळी आणि दलालांचे जाळे तपासाच्या रडारवर;  दीड कोटींच्या व्यवहाराचा संशय मुंबई/वृत्तसेवा महाराष्ट्रातील टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणाने राज्याच्या शिक्षण व्यवस्थेलाच हादरा दिला असून, या घोटाळ्याचे धागेदोरे आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील छपाई केंद्रापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका आग्रा येथील खासगी प्रेसमध्ये छापण्यात आल्या होत्या. त्यामुळे पेपरफुटीची सुरुवात नेमकी छपाई केंद्रातून झाली का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, परीक्षेच्या काही आठवडे आधी मूळ प्रश्नपत्रिका आग्रा येथील प्रेसमध्ये पाठविण्यात आल्या होत्या. तेथे भाषांतर आणि छपाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका महाराष्ट्रात पाठविण्यात आल्या. याच टप्प्यात गोपनीयतेचा भंग झाला की महाराष्ट्रात आणताना पेपर बाहेर पडले, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटीच्या मूळ प्रश्नपत्रिकांचे संच जप्त करण्...

अधिवेशनात आमदार खरात यांनी वेधले पंकजाताईंचे लक्ष; विषय होता शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याच्या गरजेचा रेटला मुद्दा

इमेज
अधिवेशनात आमदार खरात यांनी वेधले पंकजाताईंचे लक्ष;           विषय होता शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याच्या गरजेचा रेटला मुद्दा ! मेहकर/वृत्तसेवा  विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा प्रश्न प्रभावीपणे मांडत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंढे यांचे लक्ष वेधले. शेतीला पूरक आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सभागृहात मांडले. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना खरात यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दुग्ध व्यवसायासारखे पूरक उद्योग मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष दुग्ध विकास धोरण राबवावे. बुलढाणा, वाशीम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील दूध ...

सीलबंद बंगल्यातील मध्यरात्रीची घुसखोरी; लाचखोर अधिकाऱ्याचे पुरावे गायब करण्याचा कट?

इमेज
सीलबंद बंगल्यातील मध्यरात्रीची घुसखोरी;  लाचखोर अधिकाऱ्याचे पुरावे गायब करण्याचा कट? जळगाव/वृत्तसेवा लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सीलबंद घरात मध्यरात्री झालेली रहस्यमय घुसखोरी आणि त्यानंतर झालेल्या दोन जणांच्या अटकेमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. हा केवळ घरफोडीचा प्रयत्न होता की भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला कट होता, याचा शोध आता पोलीस आणि तपास यंत्रणा घेत आहेत. जळगावचे जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्यावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांचे गणेश कॉलनीतील निवासस्थान सील करण्यात आले होते. मात्र, सीलबंद घराच्या शांततेला मध्यरात्री अचानक तडा गेला. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्तींनी घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून शिडीच्या साहाय्याने घरात प्रवेश केला. सीलबंद घरातून येणारे आवाज ऐकून सतर्क झालेल्या शेजाऱ्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घराच्या आतून प्...

मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान; शहीद जवान अंकुश महादेव मिसाळ अनंतात विलीन; मेहुणाराजा गावातील वीरपुत्राला हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप

इमेज
मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान;  शहीद जवान अंकुश महादेव मिसाळ अनंतात विलीन मेहुणाराजा गावातील वीरपुत्राला  हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप                                                                                                          मेहुणाराजा (ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) :- जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावताना वीरमरण आलेले भारतीय सैन्याच्या ३३ मिडीयम रेजिमेंटमधील हवालदार अंकुश महादेव मिसाळ हे मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत अनंतात विलीन झाले.  सोमवारी (दि. २९ जून) दुपारी सुमारे २ वाजता त्यांच्या मूळ गावी मेहुणाराजा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सैन्य अधिकारी उपस्थित राहून या वीरपुत्राला अश्...

टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; आंतरराज्यीय रॅकेटचा संशय; एसआयटीमार्फत तपास सुरु; आणखीही काही आरोपी जाळ्यात येण्याची शक्यता ..!

इमेज
टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी आंतरराज्यीय रॅकेटचा संशय;  एसआयटीमार्फत तपास सुरु  आणखीही काही आरोपी जाळ्यात येण्याची शक्यता ..! भिवंडी/वृत्तसेवा  राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून भिवंडी न्यायालयाने त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील लाखो टीईटी परीक्षार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर आरोपींना हजर करण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी अधिक कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धीरज बलराज सिंग (वय २८, रा. हरियाणा), राजीव साव (वय ४५, रा. बिहार) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (वय ३०, रा. बिहार) यांचा समावेश आहे. या तिघांचा पेपरफुटी प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सा...

केंद्रीय मंत्र्यांचा मोठा गैरव्यवहार; पदाचा दुरुपयोग करीत जनतेच्या पैशांची लूट! स्वतःच्याच मंत्रालयातून ९९ लाखांहून अधिक अनुदान लाटले

इमेज
केंद्रीय मंत्र्यांचा मोठा गैरव्यवहार;  पदाचा दुरुपयोग करीत जनतेच्या पैशांची लूट! स्वतःच्याच मंत्रालयातून ९९ लाखांहून अधिक अनुदान लाटले राजस्थान/वृत्तसेवा भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने पदाचा दुरुपयोग करून जनतेच्या कराच्या पैशांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी स्वतःच्या मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ योजनेचा वापर करत ९९ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान लाटले आहे. हा प्रकार इतका स्पष्ट आणि निर्लज्ज आहे की, स्वतः मंत्री भगीरथ चौधरी यांच्याच शेतातील फलकाने त्यांचा भ्रष्टाचार उघड करून टाकला आहे. अजमेर जिल्ह्यातील पीह गावात भगीरथ चौधरी यांची शेती आहे. येथे कृत्रिम तलाव, चार मोठे पॉलीहाऊस आणि काकडी शेतीसाठी भव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे.  या प्रकल्पावर लावलेल्या फलकावर स्पष्ट उल्लेख आहे – “राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, कृषी मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहाय्याने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.” लाभार्थी म्हणून भगीरथ चौधरी यांचे नाव आणि  ५० टक्के अनुदान म्हणून ९९ लाख ६०...

परदेशातील उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष; महाराष्ट्रातील २५ तरुण म्यानमारमध्ये अडकले, मानवी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

इमेज
परदेशातील उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष;  महाराष्ट्रातील २५ तरुण म्यानमारमध्ये अडकले,  मानवी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश बीड/वृत्तसेवा   परदेशात लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत महाराष्ट्रातील तरुणांची फसवणूक करून त्यांना थायलंडमार्गे म्यानमारमध्ये नेऊन सायबर गुन्ह्यांमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील सुमारे २५ तरुण मानवी तस्करीचे बळी ठरल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. माहितीनुसार, संबंधित तरुणांना थायलंडमध्ये डेटा एंट्री, ग्राहक सेवा किंवा आयटी क्षेत्रातील आकर्षक नोकऱ्या मिळतील, असे सांगण्यात आले होते. काहींनी या नोकऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून एजंटांच्या माध्यमातून परदेश गाठला. मात्र थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना म्यानमार, थायलंड आणि लाओस यांच्या सीमेवरील कुप्रसिद्ध "गोल्डन ट्रँगल" परिसरात नेण्यात आले. तिथे पोहोचल्यावर या तरुणांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांना सायबर फसवणूक करणाऱ्या केंद्रांमध्ये डांबून ठेवण्यात आले. पीडितांन...

कल्याणमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; महिला वकिलाला अटक, दोन महिलांची सुटका

इमेज
कल्याणमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश;  महिला वकिलाला अटक, दोन महिलांची सुटका कल्याण / वृत्तसेवा ठाणे गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने (AHTC) कल्याण पूर्व परिसरात कथित देहव्यापार रॅकेटवर कारवाई करत एका महिला वकिलाला अटक केली असून दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी मानवी तस्करी विरोधी पथकाने बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला. छाप्यादरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एका महिला वकिलाला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेली महिला कल्याण आणि पनवेल न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत तपशील पोलिसांकडून अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. पोलिस आता या ...

राज्यातील ६ जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा गैरव्यवहार; हजेरीपत्रकातील तफावत, बोगस जॉबकार्ड आणि अतिरिक्त देयकांचा संशय

इमेज
  राज्यातील ६ जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा गैरव्यवहार;  हजेरीपत्रकातील तफावत,  बोगस जॉबकार्ड आणि अतिरिक्त देयकांचा संशय मुंबई/वृत्तसेवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) राज्यातील सहा जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींमध्ये गंभीर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हजेरीपत्रकातील तफावत, बोगस व दुबार जॉबकार्ड, कामाच्या दिवसांची फुगवलेली नोंद आणि मजुरांच्या नावावर अतिरिक्त देयके काढल्याचे प्रकार उघड झाल्याने ग्रामीण विकास यंत्रणेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य विधानसभेत आमदार अशोकराव माने आणि संतोष दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित माहिती दिली. मार्च २०२६ मध्ये सादर करण्यात आलेल्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) अहवालातही मनरेगा अंमलबजावणीतील अनेक त्रुटी आणि गैरव्यवहारांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. अहवालानुसार संभाजीनगर, अमरावती, पालघर, धाराशिव, अहिल्यानगर आणि नागपूर या जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींच्या कामांची तपासणी करण्यात आली....

मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा बाजारात? भिवंडीतील ॲमेझॉन गोदामावर एफडीएची मोठी कारवाई; परवाना निलंबित, दोघांवर गुन्हा दाखल

इमेज
मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा बाजारात?  भिवंडीतील ॲमेझॉन गोदामावर एफडीएची मोठी कारवाई;  परवाना निलंबित, दोघांवर गुन्हा दाखल मुंबई/वृत्तसेवा   राज्यात अन्न भेसळ, गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेदरम्यान अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भिवंडीतील ॲमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामावर मोठी कारवाई केली आहे. मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठविल्याचा संशय व्यक्त करत एफडीएने सुमारे दीड टन कालबाह्य आणि खराब झालेला खाद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीएला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील सरवली परिसरातील गोदामातून मुदत संपलेले खाद्यपदार्थ नियमानुसार नष्ट न करता पुन्हा विक्रीसाठी पाठविले जात असल्याचा संशय होता. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २४ जून, बुधवारी मध्यरात्री छापा टाकून तपासणी केली. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य, खराब झालेला आणि मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकणारा खाद्...