पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साखरखेर्डा येथे गॅस सिलिंडर टंचाईचा स्फोटक मुद्दा; नागरिक त्रस्त, एजन्सीच्या कारभारावर गंभीर प्रश्न रांगेत उभे राहूनही सिलिंडर नाही; “टंचाई नाही” म्हणणाऱ्या यंत्रणेवर लोकांचा संताप

इमेज
साखरखेर्डा येथे गॅस सिलिंडर टंचाईचा स्फोटक मुद्दा; नागरिक त्रस्त, एजन्सीच्या कारभारावर गंभीर प्रश्न रांगेत उभे राहूनही सिलिंडर नाही; “टंचाई नाही” म्हणणाऱ्या यंत्रणेवर लोकांचा संताप साखरखेर्डा (प्रतिनिधी):- साखरखेर्डा परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईने तीव्र स्वरूप धारण केले असून, सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. आज सकाळी समोर आलेल्या दृश्यांमध्ये ग्राहकांनी स्वतःचे रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून येत आहे. काही नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करूनही सिलिंडर न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी गॅस हा अत्यावश्यक घटक बनला असताना, अशा प्रकारे निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ गैरसोय नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारी आहे. महिलांना विशेषतः या टंचाईचा मोठा फटका बसत असून, पर्याय नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. दरम्यान, या टंचाईमागील वास्तव काय आहे, याबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे. काही नागरिकांनी गॅस पुरवठा व्यवस्थेतील संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला असता, “गॅसची कोणतीह...

देऊळगावराजा तालुका ठरला जिल्ह्यात अव्वल! बारावीचा ९८.८७% झंझावाती निकाल; बुलढाण्यात प्रथम क्रमांक

इमेज
  🏆 देऊळगावराजा तालुका ठरला जिल्ह्यात अव्वल! 🎯 बारावीचा ९८.८७% झंझावाती निकाल; बुलढाण्यात प्रथम क्रमांक देऊळगावराजा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेत देऊळगावराजा तालुक्याने ९८.८७ टक्के निकाल नोंदवत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दमदार यशामुळे तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. 📊 बुलढाणा जिल्ह्याचा निकाल एक नजरात : बुलढाणा – ९७.८२% मोताळा – ९०.४९% चिखली – ९८.३८% सिंदखेडराजा – ९८.०९% लोणार – ९६.८७% मेहकर – ९४.९५% खामगाव – ९४.८९% शेगाव – ८७.५५% नांदुरा – ९१.०७% मलकापूर – ९१.१७% जळगाव जामोद – ९३.०७% संग्रामपूर – ९३.८१% 👉 देऊळगावराजा – ९८.८७% 🥇 (जिल्ह्यात प्रथम) देऊळगावराजा तालुक्याने इतर सर्व तालुक्यांना मागे टाकत यंदा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. 🏫 महाविद्यालयांची दमदार कामगिरी तालुक्यातील अनेक महाविद्यालयांनी उल्लेखनीय निकाल नोंदवला: छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, देऊळगावराजा – ९६.९२% यशवंत आर्ट्स ज्युनिअर कॉलेज, दिग...

सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर नऊ कॉलेजेसचा निकाल १०० टक्के

इमेज
सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर  नऊ कॉलेजेसचा निकाल १०० टक्के  सिंदखेडराजा:- तालुक्यात बारावी परीक्षेचा निकाल यंदा अत्यंत उज्ज्वल लागला असून 100 टक्के निकाल देणाऱ्या महाविद्यालयांनी अग्रस्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे मुलींनी पुन्हा एकदा सरस कामगिरी करत “बाजी मारली” आहे. तालुक्यातील 27 कनिष्ठ व 2 तांत्रिक महाविद्यालयांचा एकूण निकाल 98.09 टक्के लागला. एकूण 3,221 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 3,196 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 3,135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 1,196 विशेष प्राविण्य, 1,454 प्रथम श्रेणी, 451 द्वितीय श्रेणी व 34 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुलींची कामगिरी विशेष ठरली. 100 टक्के निकाल देणारी अव्वल महाविद्यालये एस. ई. एस. साखरखेर्डा, मौ. अबुल कलाम आझाद उर्दू (सिंदखेडराजा), पंडित नेहरू (मलकापूर पांग्रा), अटलबिहारी वाजपेयी (राहेरी बु.), जान्हवी (दुसरबीड), आदर्श (सिंदखेडराजा), कामक्षा देवी (किनगाव राजा), उत्कर्ष (सिंदखेडराजा), तसेच एस. ई. एस. व्यावसायिक (साखरखेर्डा) या महाविद्यालयांनी 100% निकाल नोंदवत मानाचा तुरा रोवला आहे. उत...

विधानपरिषदेची संधी हुकली; सिंदखेडराजात राजकीय तापमान चढले, इच्छुकाच्या आमदारकीच्या स्वप्नांना तात्पुरता ब्रेक

इमेज
  विधानपरिषदेची संधी हुकली;  सिंदखेडराजात राजकीय तापमान चढले,  इच्छुकाच्या आमदारकीच्या स्वप्नांना तात्पुरता ब्रेक सिंदखेडराजा : प्रतिनिधी सिंदखेडराजा तालुक्यातील राजकीय पटावर सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. विधानपरिषदेच्या निवडीच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी इच्छुक नेत्याच्या हातातून अखेरच्या क्षणी संधी निसटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदारकीची स्वप्ने डोळ्यांत साठवून मोठ्या ताकदीने तयारी करणाऱ्या या नेत्याला अंतिम टप्प्यात डावलण्यात आल्याने समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या इच्छुकाने पक्षांतर्गत तसेच वरिष्ठ पातळीवर जोरदार लॉबिंग केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बैठका, गावागावांत संपर्क मोहिमा आणि राजकीय हालचालींना दिलेला वेग पाहता त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. अनेकांनी तर त्यांच्या निवडीची खात्री गृहीत धरून पुढील राजकीय समीकरणांची आखणीही सुरू केली होती. मात्र अंतिम यादी जाहीर होताच चित्र पालटले आणि त्यांच्या नावाचा अभाव स्पष...

धार्मिक विद्वेषाची बीजे राजकीय लाभासाठीच – सत्यपाल महाराज

इमेज
  धार्मिक विद्वेषाची बीजे राजकीय लाभासाठीच – सत्यपाल महाराज महिलांनी स्वतःला डोळस बनवल्यास समाजातील अंधश्रद्धा अक्षरश: कोसो दूर जाईल सिंदखेडराजा:- स्वतःचे व कुटुंबाचे भले होईल ह्या आशेतून महिला श्रद्धेतून अंधश्रद्धा व बुवाबाजीच्या फासांत अडकतात व त्याचे वाईट परिणाम समाजात दिसून येतात. त्याचेच उघड उदाहरण नाशिकच्या खरात प्रकरणात उमटून पडले आहे. त्यामुळे स्वतःच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सक्षम मेंदूला विचारावीत. त्यासाठी वैचारिक बाजू कणखर ठेवावी लागते व ती शिक्षण तसेच वाचनातून येत असल्याचे प्रतिपादन सप्तखंजेरी वादक किर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले. तालुक्यातील साखरखेर्डा येथील महाकालेश्वर मंदिर परिसरात ७ एप्रिल मंगळवारी आयोजित महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधनपर कीर्तनात सत्यपाल महाराज बोलत होते.  आपल्या किर्तनात त्यांनी महिलांनी ढोंगी बाबा आणि बुवाबाजीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. नव्हेतर मुलं होण्यासाठी, वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी किंवा संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्याही बाबाकडे जाणे ही चुकीची मानसिकता असल्या...

डॉ. विशाल इंगोले हे संवेदनशील तसेच धारिष्ट्यवान विचारांचे कवी होते - साहित्यिक बाबाराव मुसळे

इमेज
डॉ. विशाल इंगोले हे संवेदनशील तसेच धारिष्ट्यवान विचारांचे कवी होते - साहित्यिक बाबाराव मुसळे सिंदखेडराजा:- स्व. डॉ. विशाल इंगोले यांच्या कविता वाचली म्हणजे विद्रोहाच्या स्फोटातून क्रांती पेटवणारी मशाल ठरावी, एवढी धारिष्ट्याची ती कविता होती असे वक्तव्य प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, जेष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे, वाशिम यांनी केले. तालुक्यातील दुसरबीडच्या नगरमाळ येथील सावित्रीबाई मंगल कार्यालयात आज दि. ५ एप्रिल, रविवारी आयोजित स्मृतीशेष कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिकाजी तळेकर, खैरव हे तर प्रसिद्ध चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार, पेण व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख हे प्रमुख उपस्थित होते.  कार्यक्रमात सर्वप्रथम प्रसिद्ध युवा कवी तान्हाजी बोऱ्हाडे, मु. कानसे, पो. शिनोली, ता. आंबेगाव, जि. पुणे यांना स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना बाबाराव मुसळे यांनी कवितेच्या निर्मिती व प्रकाशनाची प्रक्रिया कथन केली. आपल्या ह्या अभ्यासातून तान्हाजी बोऱ्हा...

पोलीस पाटलांनी गावांतील शांततेला प्राधान्य द्यावे - गणेश डोईफोडे :: कार्यकारिणी अध्यक्षपदी दिगंबर पाटील तर सचिवपदी तुषार चव्हाण

इमेज
  पोलीस पाटलांनी गावांतील शांततेला प्राधान्य द्यावे - गणेश डोईफोडे  (अध्यक्ष व सचिवांचा सत्कार करताना दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे) कार्यकारिणी अध्यक्षपदी दिगंबर पाटील तर सचिवपदी तुषार चव्हाण   सिंदखेडराजा:- पोलीस पाटलांनी गावांतील घडामोडींचा अगदी बारकाईने अभ्यास करीत त्यातील शांतता व सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या घटनांबाबत पोलिसांना सचेत करीत राहावे, असे आवाहन दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे यांनी केले आहे. दि. २ मार्च, गुरुवारी पोलीस स्टेशन साखरखेर्डा अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांच्या बैठकीत डोईफोडे हे बोलत होते.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार गजानन करेवाड तर गणेश डोईफोडे हे प्रमुख उपस्थित होते.  या बैठकीत पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांच्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये डिगांबर पुंडलिक अंभोरे, गजरखेड ‌यांची अध्यक्षपदी तर तुषार उत्तमराव चव्हाण, हनवतखेड यांची सचिवपदी, राजू आत्माराम खरात, रान‌अंत्री यांची उपाध्यक्षपदी तर कोषाध्यक्ष म्हणून प्रताप रतिराम लंबे यांची निवड करण्यात आली आहे.  यावेळी कार्यकारिणी पदाधिकारी निवडण्यासाठी सूच...

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप! सरपंच नलिता गरड यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप! सरपंच नलिता गरड यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत अखेर राजकीय घडामोडींना उधाण येत सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार यांच्या निर्देशानुसार आज (दि. ३० मार्च, सोमवार) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बहुमताने हा ठराव पारित झाल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याची चर्चा रंगली आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी सादर केलेल्या ठरावात सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांचा विश्वासात घेत नाहीत, उलट जनहिताच्या विरोधात निर्णय घेत असल्यामुळे गावाच्या विकासकामांना खीळ बसली आहे,” असा आरोप सदस्यांनी केला. याशिवाय प्रशासनात समन्वयाचा अभाव, विकासकामांतील अनियमितता, सदस्यांशी सहकार्याचा अभाव आणि ग्रामपंचायत कारभारातील पारदर्शकतेचा अभाव ही कारणे ठरावात नमूद करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे, सरपंचांच्या पतीकडून कार्यालयीन कामात सतत हस्तक्षेप होत अस...

कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या 'जळताना भुई पायतळी' कवितासंग्रहाला जाहीर..! ५ एप्रिल रोजी दुसरबीड येथे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते व चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीत होणार वितरण

इमेज
कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या 'जळताना भुई पायतळी' कवितासंग्रहाला जाहीर..! ५ एप्रिल रोजी दुसरबीड येथे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते व चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीत होणार वितरण मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध दिवंगत कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार यावर्षी तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी दिली.  तान्हाजी बोऱ्हाडे हे इतिहास विषयात उच्चविद्याविभूषित असून ते सध्या पुणे जिल्ह्यातील मोहे या गावी शासकीय आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच दुर्गम भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी बाबत ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. विष्णू जोशी यांच्या काव्याग्रह प्रकाशन, वाशिम द्वारा प्रकाशित जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहाचा सुलगती हे धरा पैरोतले हा हिंदी अनुवाद देखील प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ ग्रा...

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत निधी अपहाराचा गंभीर आरोप; सरपंच-सचिवांवर चौकशीची मागणी

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत निधी अपहाराचा गंभीर आरोप;  सरपंच-सचिवांवर चौकशीची मागणी सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून, सरपंच व सचिवांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड आणि सचिव पी. जी. जाधव यांनी पूर्वीचे ग्रामसेवक जी. आर. गवई यांच्या संगनमताने विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, सदस्यांना विश्वासात न घेता व ग्रामसभेची मंजुरी न घेता थेट कामे दाखवून खोटे बिल सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीसह इतर खात्यांमधील रक्कम काढून घेतल्याचे, तसेच प्रत्यक्षात काम न करता बिल पास करून निधीचा अपहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, अधिकृत अधिकार नसताना डीएससी (डिजिटल सिग्नेचर) चा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत....

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांचा बंडाचा झेंडा; सरपंचांवर अविश्वासाचा निर्णायक डाव नऊ पैकी आठ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात थेट मोर्चेबांधणी

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांचा बंडाचा झेंडा; सरपंचांवर अविश्वासाचा निर्णायक डाव नऊ पैकी आठ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात थेट मोर्चेबांधणी सिंदखेडराजा (प्रतिनिधी)  तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नऊ पैकी आठ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांविरोधात उघड बंड पुकारण्यात आले आहे. सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अविश्वास प्रस्ताव थेट तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला आहे. या बंडामागे केवळ नाराजी नसून, ग्रामपंचायतीतील सत्ताबदलाचे स्पष्ट संकेत दिसत असल्याची चर्चा गावपातळीवर रंगली आहे. जवळपास सर्वच सदस्यांनी एकत्र येत सरपंचांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये “ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता नाही, सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, विकासकामे ठप्प झाली आहेत,” असे गंभीर आरोप केले आहेत. या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या सदस्यांमध्ये विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरुड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, म्हस्के मीनाक्षी विनोद आणि भा...

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

इमेज
चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा सिंदखेडराजा:- नजीकच्या चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणी माजी आमदार यांच्या भूमिकेला लक्ष करीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख असलेल्या सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरळसरळ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात चिखला काकड, ता. लोणार येथील प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या जातीयवादी विखारी भूमिकेमुळे अस्वस्थ झाल्याचे राजीनामा पत्रात विदित करीत सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी राजीनामा मंजूर करुन आपला श्वास मोकळा करण्याचे राजीनामा पत्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविले आहे. ह्या राजीनामा पत्रात पुढे म्हटले आहे की, शिवसेनेचे संस्थापक माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रवाहित करण्याचे काम शिव...