पोस्ट्स

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा 'बर्निंग बस' चा थरार .. चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अनर्थ टळला तेहतीस जण बचावले

इमेज
  समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा 'बर्निंग बस' चा थरार .. चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अनर्थ टळला तेहतीस जण बचावले  सिंदखेडराजा : अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर चॅनल २८० वर अचानक आग लागली. या घटनेत बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालकांसह तेहतीस प्रवाश्यांचे प्राण बचावले.  एमएच ३७ टी ५४५४ क्रमांकाची बस अमरावती येथून  पुणे कडे जात होती.  ३० सप्टेंबर, शनिवारी रात्री निघाली होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्र.  २८० जवळ बसने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत, बस रस्त्याच्या बाजुला थांबवली व ताबडतोब सर्वच प्रवाशांना खाली उतरवले. ह्या घटनेची माहिती मिळताच फर्दापूर चाैकीचे पीएसआय उज्जैनकर, पोहेकाॅ काेळी, पाेकाॅ नाझीर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्यूआरव्ही पथकाला पाचारण करीत, वेळीच आग विझवण्यात आली. ह्या घटनेतील चालक शेख रज्जाक शेख आयुब, रा. दारव्हा, जि. यवतमाळ आणि प्रविण मुंडे, रा. मंगरुळपीर, जि. वाशीम यांच्यासह ३२ प्रवाशी सुखरुप आहेत. अचानक घडलेल्या झालेल्या ह्या प्रकाराने भयभीत झा...

खैरव येथील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

इमेज
  खैरव येथील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील खैरव येथील दिनकर बाळाजी भुसारी वय ७२ वर्षे यांनी विषारी औषधी प्राशन करीत आत्महत्या केली आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या दिनकर भुसारी यांच्याकडे अंदाजे अडीच एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी व नातू पणतू आदि सदस्य आहेत. पिढ्यानपिढ्याची गरीबी, त्यात कर्करोगाचे आजारपण, पेरणी व पिकांची मशागत आदि बाबींवर झालेला खर्च, त्यामुळे औषधी घेण्यासाठीही रक्कम नव्हती. त्यातच पीक परिस्थिती बरी असतांनाच पावसाने दिलेली उघडीप त्यातून येत्या काळातील संभाव्य नापिकी आदि अनेक चिंतांमधून त्यांनी काल दि. २५ ऑगस्ट, शुक्रवारी विषारी औषधी प्राशन केली. उपचारासाठी देऊळगाव मही येथे नेल्यावर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथील इस्पितळात हलविले असता, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे.  यासंदर्भात माजी सरपंच संजय तळेकर, पोलीस पाटील बबन घुगे आदिंनी संबंधित गावपातळीवरील कर्मचारी यांना माहिती दिली आहे. जालना येथे शवविच्छेदन झाल्यावर आज दुपारी बारा वा. सुमारास खैरव येथ...

आज व्हीटी सरांचा स्मृतीदिन ..! मनात काहूर अन हुरहूर ...!!

इमेज
  आज व्हीटी सरांचा स्मृतीदिन ..! मनात काहूर अन हुरहूर ...!! दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे दि. १९ जुलै २०२१ रोजी मला कॉल करुन एका व्यक्तीने व्हीटी सरांच्या निधनाची बातमी कळवली. विश्वास बसतच नव्हता, कारण रोज किंवा तिसऱ्या दिवशी भेट होत होती. मात्र त्यांना हृदयविकार असल्याचे माहीत होते. त्यामुळे जागदरी, ता. सिंदखेडराजा येथे संपर्क साधून विचारले असता, ती माहिती खरी असल्याचे सांगण्यात आले. प्रचंड हादरलो.  आठवणींनी मनात काहूर उठले. जागदरी ह्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक एक बाब समोर ठेऊन, काय काय अन कसे कसे नियोजन करायचे? चर्चेतून ठरत होते. त्याचवेळी त्यात खिळ घालणाऱ्या घटकांचा कसा बंदोबस्त करायचा हेही नजरेसमोर होते. त्याच दृष्टिकोनातून व्हीटी सरांच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वीच राजकीय, सामाजिक आदि विविध प्रकारची  उपाययोजना करण्यासाठी बुलढाणा येथे जाऊन आलो होतो. दिवसभर सोबत होतो. त्यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवदास रिंढे सोबत होते. गावाच्या विकासासाठी राजकारण विरहित फक्त मैत्री जपणारा शिवदास आमच्या सोबत दिवसभर होता.  जागदरी गावाच्या विकासासाठी व्ही...

लाड झालेत लाखांचे ; करोडोंची किंमत नाही? मूल्य मात्र मोजावे लागणार ..

इमेज
 लाड झालेत लाखांचे करोडोंची किंमत नाही? मूल्य मात्र मोजावे लागणार .. एक काकुळतीला आलेला शेवटच्या क्षणाचा प्राणी .. आयुष्यात त्याने विरोध केला असेल, कुणाचे वैर पत्करले नाही, आणि दुश्वासही केला नाही. जगणं भारी होत असतांना घरगुती बाबतीवरुन तो कित्येकांच्या नजरेत भरला असावा. अनेकांना मदत देत, त्याने फक्त भलाईचाच धडा गिरवला. तोच आज व्याकुळ होतोय. ज्यांच्यासाठी खूप काही सोडून जावंसं वाटतंय तेच दुश्वास करताहेत. सुरेश भटांच्या भाषेत इथे एकच अध्याहृत आहे की, "मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते." त्याचवेळी जगण्याची उमेद असणारा तो म्हणाला की, कितीही वेळा झाले तरी छळ सोसणार,  पण जगणे काय असते? ते तर ह्याचजन्मी दाखवून देणार. कारण त्याने सोसलेलं तो कधीच बोलला नाही. जगण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्यांच्या आयुष्यात केवळ शेवटच्या ओळी त्याच्याच असतील. मोकळा श्वास दुर्मिळ होतो तेंव्हा आयुष्यात संघर्ष करीत करीत .. जगण्याचा श्वास घेत  इथपर्यंत जरी उरला असशील .. जगण्याची नाळ समजण्यासाठी शोध घेत घेत फुका वाया गेला असशील .. तुझ्या भरवस्यावर जगण्याची इच्छा असल्याने ते कृत्य वाईट करीत असतील .. त्य...

सौ. अलका सुधाकर नागरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

इमेज
  सौ. अलका सुधाकर नागरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित सिंदखेडराजा:- तालुक्यातील बारलिंगा येथील सौ. अलका सुधाकर नागरे यांना सामाजिक कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दि.३० जून रोजी, महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बालविकास विभागातर्फे तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या महिला सदस्या सौ.अलका सुधाकर नागरे यांना सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी व जनतेच्या हितासाठी केलेल्या योगदानाबद्दल  'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ह्या सन्मानाने गौरवित करण्यात आले आहे.  ह्याप्रसंगी सरपंच नलिनीताई राजेंद्र गरड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ह्यावेळी सुधाकर नागरे, माजी सरपंच संजय तळेकर, राजेंद्र गरड, राजेंद्र नागरे, रवींद्र टाले, सुरेश भालेकर, संतोष नागरे व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

इमेज
यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव  गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न सिंदखेडराजा:- यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. ते मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास व त्यामध्ये अपयशाने गर्भगळीत न होता, त्याकडे दुर्लक्ष करीत, अभ्यासात शेवटपर्यंत सातत्य ठेवावे लागते, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षेतील गुणवंत गौरव गंगाधर कायंदे याने केले. देऊळगावराजा येथील योगीराज लॉन्स येथे दि. २५ जून, रविवारी संत श्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठान बुलढाणा-जालना यांच्यावतीने आयोजित 'प्रथम विदर्भ वंजारी समाजरत्न' सन्मान व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात गौरव कायंदे सत्काराला उत्तर देत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तोताराम कायंदे, तर हभप सानप गुरुजी, प्रा.गंगाधर कायंदे, राजेंद्र वाघ, जालिंदर बुधवत, विनोद वाघ, सौ. नंदाताई कायंदे, सौ. शारदाताई जायभाये, आत्माराम कायंदे, भगवान मुंढे, देवानंद कायंदे, दादाराव खार्डे, गणेश मांटे, प्रकाश गीते, रमेश कायंदे, तोताराम  नागरे, सावळाराम नागरे, बद्री बोडखे, डॉ. केशव आघाव, युवराज नागरे, वामनराव आघाव, अमोल काक...

तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध .. एकूण ४ हजार ६६४ जागांवर पदभरती

इमेज
  तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध .. एकूण ४ हजार ६६४ जागांवर पदभरती  बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार आहे. (सौजन्य:- लोकसत्ता टीम, नागपूर) तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, ४ हजार ६६४ जागांवर पदभरती, जाणून घ्या कुठल्या जिल्ह्यात किती जागा असणार? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स) नागपूर : बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार आहे. यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या बातमीमुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील पुण्यासह नाशिक,...

आषाढ महिना? नेमके काय??

इमेज
  आषाढ महिना? नेमके काय?? आषाढ महिना वारकरी संप्रदायातील प्रत्येकासाठी महत्वाचा व पवित्र समजला जातो. आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे. यंदा आषाढ महिना सोमवार, १९ जून २०२३ ला सुरु होणार असून तो सोमवार, १७ जुलै रोजी संपत आहे. पंचांगानुसार, चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षाचा चौथा महिना म्हणजेच आषाढ महिना होय. हा इंग्लिश कॅलेंडरच्या जून किंवा जुलै महिन्यात येतो. या वेळी भारतात भरपूर पाऊस पडत असल्याने हा पावसाळ्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. खूप उष्णता सहन केल्यानंतर या महिन्यात आपल्याला थोडास दिलासा मिळतो. या महिन्यापासून पावसाळा सुरू होतो. हवामानातील बदलामुळे या महिन्यात आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. या हंगामात संसर्गाचा धोका लक्षणीय वाढतो. अशा परिस्थितीत या काळात पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या. (Sanskruti)आषाढ महिन्यात खाण्यापिण्याच्या या गोष्टींची काळजी घ्या- या महिन्यात पाणी असलेली फळे खा.- कमीत कमी तेलाच्या वस्तूंचे सेवन करा.- शिळे अन्न खाऊ नका. आजपासून प्रारंभ होणाऱ...

समृद्धी महामार्गावर जालना येथील दोन डिझेल चोरांना गस्त पथकाने पकडले

इमेज
  समृद्धी महामार्गावर जालना येथील दोन डिझेल चोरांना  गस्त पथकाने पकडले .. सिंदखेडराजा:- समृद्धी महामार्गावर चालकांच्या आरामासाठी उभ्या असलेल्या ट्रक मधील डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात गस्तपथक पोलिसांना यश आले आहे. यापुढे डिझेल चोरीला आळा बसणार असा विश्वास महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र दुसरबीड व उपकेंद्र फर्दापूर दरम्यान उभ्या असलेल्या जड वाहनातील डिझेल चोरणारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. महामार्गावर पेट्रोल पंप किंवा टोलनाक्यांचा आसरा घेत अनेक वाहन चालक हे रात्रीला आराम करण्यासाठी, आपले वाहन तेथे सुरक्षित असल्याच्या भावनेने उभे करतात. वाहन चालकांना झोप लागल्यानंतर डिझेल टाकीचे लॉक तोडून गाडीमधील डिझेल  स्वयंचलीत मोटारपंपाच्या साह्याने पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या स्वतःच्या कॅनमध्ये भरून चोरटे मोकळे होतात. ह्या घटनांच्या  बऱ्याचशा वाहनचालकांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यासाठी शोध मोहीम राबवूनही डिझेल चोर हाती लागत नव्हते. नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी डिझेलच्या कॅन असलेल्या गाडीचा अपघा...

धन्यवाद ..! किरण माने सर 🙏

इमेज
  धन्यवाद ..! किरण माने सर   🙏 शरद पवारांना धमकी देणारी सागर बर्वे नामक जी व्यक्ती अटक झालीय, त्यासंदर्भात फेसबुकवर अभिनेता किरण माने यांनी आज दि. १३ जून, २०२३, मंगळवारी एक पोस्ट टाकली आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेल्यांनी विचलित होऊन अथवा खचून जाऊ नये,   यासाठी त्यामधील एक उतारा खूप महत्त्वाचा आहे. तो येथे देत आहे.   👇 यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला 'रूतबा' कमी होत नाही. आपल्यावर ते गरळ ओकतात. कारण आपल्याला, आपल्या शब्दांना, विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं उलट असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं... शत्रूवर नजर रोखायची... आणि गालातल्या गालात हसायचं .. 'पठाण' मधल्या शाहरुख सारखं .. क्यों की हमारी ताकत हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के, शोर से पता चलती है !   😊