पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मधमाशांचा हल्ल्यात नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी जखमी ..

इमेज
  मधमाशांचा हल्ल्यात नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी जखमी .. सिंदखेडराजा:- लग्न लावण्यासाठी परण्या काढत वरात घेऊन लग्नस्थळी जाणाऱ्या वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी तालुक्यातील दुसरबीड येथे आज दि.२७ फेब्रुवारी, सोमवारी घडली. या घटनेत वऱ्हाडसह नवरदेव जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.  दुसरबीड येथील गीतांजली मंगल कार्यालयात आयोजित आज एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये तालुक्यातीलच किनगावराजा येथील फुलसिंग देव्हरे यांचा मुलगा वर मंगेश फुलसिंग देव्हरे ह्याचा शुभ विवाह दुसरबीड येथीलच बबन बिथरे यांची मुलगी वधू गंगा बबन बिथरे हिच्यासोबत होणार होता.  त्यादरम्यान किनगावराजा येथून नवरदेवाची वऱ्हाडी मांडली दुसरबीड येथे पोहोचली. मंगल कार्यालयात सर्व सोपस्कार व विधी झाल्यावर सायंकाळी परण्याची वरात वाजत गाजत मंगल कार्यालयातून निघाली. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५.३० वा. सुमारास ही वरात लग्न लावण्यासाठी परत मंगल कार्यालयाकडे जात असतांनाच मार्गावरील बाभूळ बनात बँडच्या वाद्याच्या आवाजाने झाडावरील आग्या मोहोळाचे पोळे त्या वऱ्हाडी मंडळीच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्य...

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

इमेज
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्ह२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी जारी करण्यात आला. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ अनुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौ...

शिक्षक पतसंस्था निवडणुकीत एकता पॅनेलचे एकहाती वर्चस्व..

इमेज
  शिक्षक पतसंस्था निवडणुकीत एकता पॅनेलचे एकहाती वर्चस्व.. सिंदखेडराजा:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित सिंदखेडराजा र. नं. ७८८ च्या संचालक मंडळाची निवडणूक आज दि. २६ फेब्रुवारी, रविवारी घेण्यात आली. त्यामध्ये शिक्षक एकता पॅनेलने बारा जागांवर विजय मिळवत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. ही निवडणूक अविरोध व्हावी म्हणून माजी अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे तसेच बहुसंख्य शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी पतसंस्थेची उत्तम वाटचाल पाहत प्रयत्न केले. त्यामध्ये अनुसूचित जाती गटातून सुभाष सखाराम गवई, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून सुभाष झाबुसिंग पवार व इतर मागासवर्ग गटातून गंगाधर शंकरराव खरात ह्यांना अविरोध करण्यात यश आले. मात्र सर्वसाधारण व महिला राखीव गटाची निवड अविरोध करण्याचे प्रयत्न सुरु असतांनाच काहींनी त्यात बिब्बा घातला. त्यामुळे यंत्रणेला आज प्रत्यक्ष मतदान घ्यावे लागले. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे आदिंच्या नेतृत्वाखाली शिक्षक एकता पॅनेल व दिलीप खंडारे, कैलास ढोलेकर आदिंच्या नेतृत्वाखाली बहुजन शिक्षक आघाडी पॅनेल असे दोन...

लाडक्या आर. आर. आबांना, स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ..🌷🙏

इमेज
  लाडक्या आर. आर. आबांना, स्मृतीदिनी विनम्र अभिवादन .. 🌷🙏 विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेलं नेतृत्व आणि  मोकळं - ढाकळं व्यक्तिमत्त्व आठ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपल्यातून निघून गेलं. महाराष्ट्राचे लाडके आबा अर्थात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं दि. १५ फेब्रुवारी, २०१५ रोजी निधन झालं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांना काळाने गाठलं. महाराष्ट्राच्या लाडक्या आबांना कर्करोगाने हरवलं. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ◆ आर. आर. पाटील उपाख्य आरआर आबा यांचा परिचय ● रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील, आरआर आबा ● १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगलीमध्ये तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्म ● प्राचार्य पी बी पाटील यांच्या शाळेत श्रमदान करुन शिक्षण ● सांगलीतील शांतीनिकेतन महाविद्यालयात कला शाखेची पदवी आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण ● उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता ◆ राजकीय प्रवास ● १९७९ ते १९९० पर्यंत जिल्हा परिषद सदस्य ● १९९० पासून सलग सहा वेळा आमदार ● ग्रामविकास मंत्रालयाची यशस्वी धुरा...

आपल्याला भेटली का कधी? अशी प्रचंड मतलबी लोकं ..??

इमेज
आपल्याला भेटली का कधी? अशी प्रचंड मतलबी लोकं ..?? तुम्ही काय अन मी काय? मतलबी लोकांच्या त्या दुर्बीण निरीक्षणात आपण सगळेच आहोत. ही मतलबी लोकं अनाकलनीय असतात. मतलब नसेल तर कधीच भेटत नाहीत. एखाद्या कार्यक्रमात भेट झाली की एवढे वाकतात (म्हणजे लवतात) की आपल्याला स्वतःची शरम वाटू लागते. अन जर ती स्वत: होऊन संपर्क साधत आपल्याकडे आली किंवा प्रत्यक्षात भेटली तर नक्कीच मोठा वांधा आपल्यासारख्यांचा होतोच. सार्वजनिक क्षेत्रात आपल्याला प्रतिष्ठा आहे, ह्यावर ही मंडळी चोखपणे लक्ष ठेवून असते. आपल्याशी भेटून अथवा संपर्क करुन काय बोलतील? अन इतरांना त्याचा मतितार्थ काय सांगतील?, ह्याचा नेमच नसतो. कारण त्यांना फक्त त्यांचा मतलब साध्य करायचा असतो. तो तर त्यांच्या बेशरमपणाचा  कळसच असतो. त्यानंतर त्यांच्या मतलबाची योग्य वेळ निघून गेली की, त्या घडलेल्या किंवा न घडलेल्या गोष्टींचे, त्यांच्या दृष्टीकोनातून मतलबात रूपांतर केल्या गेलेल्या बाबी कानावर येतात. तेंव्हा आपण कितीही प्रामाणिकपणे चालणारे असलो किंवा कठोर असलो, तरीही आपला मेंदू गोठविण्याची क्षमता त्या कपोलकल्पित बाबीत असते. ती मतलबी मंडळी, आपल्या नावाच...

साखरखेर्डा येथील त्या बेपत्ता प्रौढ व्यक्तीचा मृतदेहच आढळला ..

इमेज
  साखरखेर्डा येथील त्या बेपत्ता प्रौढ व्यक्तीचा मृतदेहच आढळला .. सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथील शेख सलीम शेख मन्नू कुरेशी हे दि. ४ फेब्रुवारी, शनिवारी बेपत्ता झाले होते. त्याच रात्री ११.०० वा. त्यांचा मृतदेह, उदगीर, जि. लातूर येथे आढळला असल्याची माहिती मिळाली आहे.   साखरखेर्डा येथील जाफ्राबाद मोहल्ल्यातील शेख सलीम शेख मन्नू कुरेशी, वय अंदाजे ५५ वर्षे ही व्यक्ती शनिवारी, दि. ४ फेब्रुवारी रोजी बस स्थानक परिसरात होती. शेख सलीम हे दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीय, नातेवाईक व इतर सर्वांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर साखरखेर्डा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती देण्यात आली. त्यावरुन नोंद घेत साखरखेर्डा पोलिसांनीही शोध सुरु केला होता. काल दि. ७ फेब्रुवारी, मंगळवारी रात्री ११.०० च्या सुमारास त्यांचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत मृतदेह उदगीर, जि. लातूर येथे आढळला व त्यांचा दफनविधी पार पडल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यावरुन कुटुंबीय उदगीर येथे पोहोचले आहेत. कुटुंबातील एका व्यक्तीकडून मिळालेल्या...

विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न गरजेचे - प्रकाश मुकुंद

इमेज
 विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न गरजेचे - प्रकाश मुकुंद बुलढाणा:- स्पर्धेच्या युगात विज्ञान किंवा इतर विषयांचे केवळ अध्यापन व प्रात्यक्षिक करुन भागणार नाही. तर विद्यार्थ्यांना विविध विषयांचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले. राजीव गांधी सैनिक शाळेत दि. ३१ जाने व १ फेब्रु रोजी आयोजित दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनीच्या शिक्षकांच्या कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मुकुंद बोलत होते.  कार्यशाळेत रोबोटिक्स तज्ञ काजल राजवैद्य यांनी सध्या देशविदेशात रोबोट्स वापरण्यात येत आहेत. मात्र साध्या गोष्टींसाठी हे यंत्र फायदेशीर ठरते, तर त्यापेक्षाही जास्त अपडेटिंगसाठी मेंदूचा वापर व्हावा व वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स, आर्टिफिसिअल इंटेलिजन्स निर्माण व्हावेत असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर कलर, फेसिएल, ऑब्जेक्ट, इंटेलिजन्स ट्रॅकिंग रोबोटचे आकर्षक प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांसमोर सादर केले. याचवेळी विज्ञान शिक्षक प्रल्हाद दाभाडे व ...