पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप! सरपंच नलिता गरड यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप! सरपंच नलिता गरड यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत अखेर राजकीय घडामोडींना उधाण येत सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार यांच्या निर्देशानुसार आज (दि. ३० मार्च, सोमवार) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बहुमताने हा ठराव पारित झाल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याची चर्चा रंगली आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी सादर केलेल्या ठरावात सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांचा विश्वासात घेत नाहीत, उलट जनहिताच्या विरोधात निर्णय घेत असल्यामुळे गावाच्या विकासकामांना खीळ बसली आहे,” असा आरोप सदस्यांनी केला. याशिवाय प्रशासनात समन्वयाचा अभाव, विकासकामांतील अनियमितता, सदस्यांशी सहकार्याचा अभाव आणि ग्रामपंचायत कारभारातील पारदर्शकतेचा अभाव ही कारणे ठरावात नमूद करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे, सरपंचांच्या पतीकडून कार्यालयीन कामात सतत हस्तक्षेप होत अस...

कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या 'जळताना भुई पायतळी' कवितासंग्रहाला जाहीर..! ५ एप्रिल रोजी दुसरबीड येथे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते व चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीत होणार वितरण

इमेज
कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या 'जळताना भुई पायतळी' कवितासंग्रहाला जाहीर..! ५ एप्रिल रोजी दुसरबीड येथे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते व चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीत होणार वितरण मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध दिवंगत कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार यावर्षी तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी दिली.  तान्हाजी बोऱ्हाडे हे इतिहास विषयात उच्चविद्याविभूषित असून ते सध्या पुणे जिल्ह्यातील मोहे या गावी शासकीय आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच दुर्गम भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी बाबत ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. विष्णू जोशी यांच्या काव्याग्रह प्रकाशन, वाशिम द्वारा प्रकाशित जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहाचा सुलगती हे धरा पैरोतले हा हिंदी अनुवाद देखील प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ ग्रा...

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत निधी अपहाराचा गंभीर आरोप; सरपंच-सचिवांवर चौकशीची मागणी

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत निधी अपहाराचा गंभीर आरोप;  सरपंच-सचिवांवर चौकशीची मागणी सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून, सरपंच व सचिवांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड आणि सचिव पी. जी. जाधव यांनी पूर्वीचे ग्रामसेवक जी. आर. गवई यांच्या संगनमताने विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, सदस्यांना विश्वासात न घेता व ग्रामसभेची मंजुरी न घेता थेट कामे दाखवून खोटे बिल सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीसह इतर खात्यांमधील रक्कम काढून घेतल्याचे, तसेच प्रत्यक्षात काम न करता बिल पास करून निधीचा अपहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, अधिकृत अधिकार नसताना डीएससी (डिजिटल सिग्नेचर) चा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत....

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांचा बंडाचा झेंडा; सरपंचांवर अविश्वासाचा निर्णायक डाव नऊ पैकी आठ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात थेट मोर्चेबांधणी

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांचा बंडाचा झेंडा; सरपंचांवर अविश्वासाचा निर्णायक डाव नऊ पैकी आठ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात थेट मोर्चेबांधणी सिंदखेडराजा (प्रतिनिधी)  तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नऊ पैकी आठ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांविरोधात उघड बंड पुकारण्यात आले आहे. सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अविश्वास प्रस्ताव थेट तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला आहे. या बंडामागे केवळ नाराजी नसून, ग्रामपंचायतीतील सत्ताबदलाचे स्पष्ट संकेत दिसत असल्याची चर्चा गावपातळीवर रंगली आहे. जवळपास सर्वच सदस्यांनी एकत्र येत सरपंचांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये “ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता नाही, सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, विकासकामे ठप्प झाली आहेत,” असे गंभीर आरोप केले आहेत. या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या सदस्यांमध्ये विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरुड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, म्हस्के मीनाक्षी विनोद आणि भा...