पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज माझ्या मामांचे पुण्यस्मरण ..!🌷 माझा साळुबा मामा ..!🙏

इमेज
  आज माझ्या मामांचे पुण्यस्मरण ..!🌷 माझा साळुबा मामा ..!🙏 सावखेड तेजन, ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व आम्हा सर्व भाच्यांचे लाडके मामा श्री. साळुबा नामदेवराव जायभाये यांचे चारवर्षांपूर्वी वृद्धापकाळाने आजच्या रोजी म्हणजे दि. २४ जानेवारी,  २०२० शुक्रवारी सकाळी ५.३० वा. जालना हॉस्पिटल, जालना येथे निधन झाले. मृत्युसमयी ते वय ८५ वर्ष्यांचे होते. किनगावराजा येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शिवानंद जायभाये ह्यांचे वडील असलेले साळुबा मामा हे प्रेमळ ह्या व्याख्येच्या पलीकडे जाणारे व्यक्तिमत्त्व. त्यांची आठवण झाली की, वेगळीच ऊर्जा आम्हा भाच्यांच्या मनात निर्माण होते. आम्हा सगळ्या भाच्यांची खूप काही काळजी त्यांनी घेतली. माय ह्या शब्दात एकदाच 'मा' येतो. पण दोनदा मा येणारे जायभाये वाड्यातील आमचे बाजीराव मामा, किसन मामा, राम मामा, उत्तम मामा, कारभारी मामा, आश्रूबा मामा, लक्ष्मण मामा, भीमराव मामा आदि प्रत्येक मामा आमच्या नशिबी होते. नव्हेतर त्यांनी आमच्या व्यक्तिमत्वाला वळण लावले. म्हणूनच आम्ही घडलो. आमच्या साळुबा मामांच्या प्रेमळ स्मृती आजही उरात जिवंत आहे. इथ...

डॉ. सुनील व सौ. शिल्पा कायंदे आपणांस लग्नवाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! ह्या निमित्ताने आढावा गोतावळ्याचा ..!

इमेज
  डॉ. सुनील व सौ. शिल्पा कायंदे आपणांस लग्नवाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! ह्या निमित्ताने आढावा गोतावळ्याचा ..! लहानपणापासून ज्यांना बघत आपण मोठे होतो. त्यांचा काहीना काही प्रभाव आपल्यावर असतोच. माझ्या मामाच्या गावी म्हणजेच सावखेड तेजन येथे मी लहानाचा मोठा झालो. तेथे खेळत बागडत असतांना माय सोबत, द्रोपदाबाईला भेटण्यासाठी चेपटे कुटुंबियांच्या वाड्यातही जायचो. त्यातील प्रमुख व्यक्ती म्हणजे द्रोपदाबाईंचे पती व माझ्या वडिलांचे मित्र म्हणजेच आमच्या मुक्ताबाईचे बंधू तुकाराम चेपटे हे होते. वाड्यात गेलो की, द्रोपदा मावशी सोबतच ज्यांचा लळा लागला व सणासुदीला ज्या माहेरी यायच्या त्या आमच्या मुक्ताबाई. मला जसे आठवते त्यानुसार त्याकाळी सावखेड तेजन येथील राजकीय वर्तुळात आमची मामा मंडळी स्व. बाजीराव जायभाये, स्व. विश्वनाथ जायभाये दुकानदार, स्व. कारभारी जायभाये, विघ्ने, मांटे, बुधवत यांच्यासह डोईफोडे, सोनुने आदि अनेक व्यक्ती कार्यरत होत्या. त्यांना मार्गदर्शन देण्यात तढेगाव येथील स्व. बाबुराव कुटे, सिनगांव जहाँगीर येथील सौंदाजी पाटील डोईफोडे यांच्यासह हिंमतराव पाटील बंगाळे, पांग्री येथील वाघ, ...

बातमी मागची बातमी .. बहारदार सूत्रसंचलनाचा श्रीगणेशा होतोय ..

इमेज
बातमी मागची बातमी .. बहारदार सूत्रसंचलनाचा श्रीगणेशा होतोय .. सिंदखेडराजा:- एखादा कार्यक्रम आयोजित केल्यावर त्या कार्यक्रमाचा निवेदक योग्य आहे, असं म्हटलं की सत्तर टक्क्यांच्या वर कार्यक्रम यशस्वी होतो. राहेरी येथील नामांतर लॉंग मार्च ह्या कार्यक्रमाच्या आठवणीतून हाच अनुभव आपला लहान भाऊ गणेश ह्याने दिला. रसिक मनाचा मी एक व्यक्ती, कार्यक्रमात सहभागी जरी झालो नाही तरी त्याचा आढावा घेणे, ही प्रवृत्ती. त्यातच कुठलाही धारण केलेला मीडिया सोडल्यावर अधिक उत्सुकता तानवुन काय आणि कसं झालं? हे विचारणं नैसर्गिकच. दरवर्षी प्रमाणे काल म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी राहेरीच्या पुलावर म्हणजे आमच्या गावाच्या शिवावर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ ह्याचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व्हावे, ह्या मागणीसाठी जोगेंद्रजी कवाडे सर ह्यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च  करण्यात आला होता. तत्कालीन शासन व्यवस्थेने राहेरी पुलावर मोर्चा अडविला व मारहाण करुन आंदोलकांच्या नावावर केसेस केल्या होत्या. जानेवारी महिना त्यात सुट्या संपलेल्या असतात. घ्यायची म्हटल्यावर मिळत नाही. त्यामुळे इच्छा असूनही थोडं अडचणीचं हो...

अक्षरशः घाबरलो.

इमेज
  आज सकाळी ऑनलाइन होतो. मात्र त्यानंतर मोबाईलवर मुंग्या चढायला सुरुवात झाली. अक्षरशः घाबरलो. नंतर लक्षात आले की, आज मकर संक्रांत   त्यामुळे समजले की, आपल्या शुभेच्छांचा गोडगोड   तीळगुळ आलाय. म्हणूनच मोबाईलवर मुंग्या चढताहेत. त्यातून माझ्या अंतरीच्या शुभेच्छा आपण व कुटुंबियांना सुद्धा ..! फक्त गोडगोड बोलू नका तर  कायमच आपलं व्यक्तिमत्त्व गोडगोड ठेवा. 🙏

अपात्रतेचा निकाल तर लागला .. आता कशी असणार मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ?

इमेज
  अपात्रतेचा निकाल तर लागला .. आता कशी असणार मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ? सिंदखेडराजा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी पक्षीय व्हीप नाकारला म्हणून त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या ह्या आरोपानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश मे २०२३ नंतर देण्यात आले. ह्या प्रकरणाच्या सुनवाईत मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तीन बाबी स्पष्ट केल्या होत्या. त्यामध्ये तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ तसेच बहुमत सिध्द करण्यासाठी दिलेले निर्देश चुकीचे असल्याचे म्हटले होते. तिसरी बाब म्हणजे जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांनाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही स्पष्ट केले होते. जसे हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आले त्यानंतर निकाल उशीरा देण्यासाठी किंवा लांबविण्यासाठी वेळकाढूपणा अवलंबवण्यात आल्याचे प्रकारही घडले. त्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती.  विधानसभा अध्यक्षांनी शेवटी १२०० पाने वाचल्यानंतर एकदाचा निकाल लागला. निकाल लागल्यान...