पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सुरु होणार - वर्षा गायकवाड

इमेज
 राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सुरु होणार - वर्षा गायकवाड सिंदखेडराजा:- राज्यातील  इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्वच शाळा सुरु होणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे. आज राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राज्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते पाचवी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा आतापर्यंत बंदच होत्या. मात्र येत्या १ डिसेंबर पासून ह्या सर्वच शाळा सुरु होतील, असे वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले. याचवेळी ह्या सर्व शाळा सुरु करण्यासाठी पूर्वतयारीची प्रक्रिया सुरु झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या ह्या निर्णयामुळे पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, एवढे मात्र निश्चित ..!

चिखली येथील हत्येचा लागला छडा ..! चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी

इमेज
चिखली येथील हत्येचा लागला छडा ..! चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी सिंदखेडराजा:- चिखली येथील हमरस्त्यावरील दुकानात घुसून दुकान मालकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जनतेत क्षोभ निर्माण होत असतांनाच परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आरोपींना शोधण्याची ठाणेदार लांडे यांची तारेवरची कसरत फलदायी ठरली आहे. त्यामुळे जनतेच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. तालुक्यातील साखरखेर्डा येथे ठाणेदार म्हणून कायद्याचा आदर निर्माण करीत कर्तव्यरुपी दबदबा निर्माण करणारे अशोक लांडे हे कोणत्याही गुन्ह्याचा तपास लावण्यात यशस्वी ठरले होते. जिल्ह्याबाहेर झालेल्या त्यांच्या बदलीनंतर अनेक सुजाण जण व्यथित झाले होते. मात्र चिखली येथे त्यांची बदली झाल्यावर कायद्याचा प्रभाव व दबदबा कायम ठेवण्यासाठी अशोक लांडे यांचे प्रयत्न सुरू झाले होते. दि. १६ नोव्हेंबर, मंगळवारी रात्री अचानकपणे  चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानात रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक कमलेश पोपट यांची हत्या झाली....