दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार ..शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या परिक्षेसंदर्भात नवीन सूचना ...★ यंदा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची शाळाच असणार परीक्षा केंद्र
दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार .. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या परिक्षेसंदर्भात नवीन सूचना ... ★ यंदा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची शाळाच असणार परीक्षा केंद्र दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार असल्याची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावा असा प्रश्न होता. याविषयी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. दरम्यान आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी पालक व विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल व 21 मे 2021 ...